शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
3
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
4
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
5
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
6
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
7
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
8
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
9
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
10
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
11
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
12
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
13
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
14
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
15
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
16
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
17
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
18
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
19
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
Daily Top 2Weekly Top 5

जातीच्या संकुचित धारणा सोडून माणूस बना : श्रीपाल सबनीस -पलूस येथे २९ वे ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 01:10 IST

पलूस : ग्रामीण भागातील लेखकांनी बहुसांस्कृतिक वास्तव समजून घेतले पाहिजे. संस्कृती ही मानवनिर्मित आहे. जातीच्या संकुचित धारणा सोडून माणूस बनणे गरजेचे आहे,

ठळक मुद्देसाहित्यिकांनी ग्रामीण वास्तवाचे चिंतन करावे,मावळतीच्या प्रकाशात उगवतीची किरणे शोधायची

पलूस : ग्रामीण भागातील लेखकांनी बहुसांस्कृतिक वास्तव समजून घेतले पाहिजे. संस्कृती ही मानवनिर्मित आहे. जातीच्या संकुचित धारणा सोडून माणूस बनणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.

पलूस येथे स्वामी विवेकानंद ग्रामविकास मंडळ व पलूस तालुका मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २९ व्या मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून डॉ. सबनीस बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रकांत शहासने (पुणे) उपस्थित होते.

सबनीस म्हणाले, साहित्य म्हणजे शब्दांची आतषबाजी नाही, तर जीवनाची उपासना आहे. जीवन बदलून टाकण्यासाठी साहित्य गरजेचे आहे. साहित्यिकांनी ग्रामीण वास्तवाचे चिंतन करावे, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी शहासने म्हणाले, ग्रामीण भागात साहित्याची ऊर्जाकेंद्रे आहेत, ती शोधली पाहिजेत. मावळतीच्या प्रकाशात उगवतीची किरणे शोधायची असतात.यावेळी दत्ता मानुगडे, डॉ. अशोक माळी, प्रा. रघुराज मेटकरी, सुनील तोरणे, विजयकुमार कुलकर्णी, वृषाली कुलकर्णी, सर्जेराव नलवडे, आर. पी. सावंत यांना पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच प्रा. शिवाजी वरूडे व हरिभाऊ पुदाले यांच्या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. प्रा. संतोष काळे यांनी स्वागत केले, तर वासंती मेरू यांनी प्रास्ताविक केले. यावेळी बी. ए. पाटील, विष्णू सिसाळ यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी सुहास पुदाले, पांडुरंग पुदाले, अधिकराव मोरे, शामराव डाके, वसंत आपटे, सतीश पवार, सोपान डोंगरे, उमा पुदाले यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते, साहित्यरसिक उपस्थित होते. संतोष काळे व सायली मेरू यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. संपत पार्लेकर यांनी आभार मानले.कथाकथनाला प्रतिसादसंमेलनाच्या दुसºया सत्रात कथाकथन पार पडले. यावेळी हिम्मत पाटील यांनी ‘माती’ ही विनोदी तितकीच हृदयस्पर्शी कथा सादर करून हास्याचे फवारे आणि अश्रूंच्या धारा यांचा मिलाफ घडवून आणला. त्यानंतर कविसंमेलन पार पडले. कवी धनदत्त बोरगावे अध्यक्षस्थानी होते.पलूस येथील साहित्य संमेलनात डॉ. श्रीपाल सबनीस यांनी मार्गदर्शन केले.